जीवनात सुख आणि समृद्धी मिळावी असे प्रत्येक मनुष्याच स्वप्न असतं. ज्योतिष शास्त्रात असे बरेचसे उपाय आहे ज्यांना नियमितपणे केल्याने तुम्ही जीवनात नक्कीच सुख आणि यश मिळवू शकता. ते उपाय खालील प्रमाणे
१) घरातील प्रत्येक सदस्यांना सूर्योदयाच्या आधी जाग आली पाहिजे व त्यांनी सूर्याचे दर्शन केले पाहिजे. त्याच वेळेस जोराने गायत्री मंत्राचे उच्चारणं केल्याने घरात असणारे वास्तुदोष दूर होतात.
२) सूर्य दर्शनानंतर सूर्याला पाणी, पुष्प आणि अक्षतांचे अर्घ्य द्यायला पाहिजे.
३) झोपेतून उठल्यावर दोन्ही पाय जमिनीवर एकाच वेळेच ठेवायला पाहिजे आणि त्याच वेळेस आपल्या इष्ट देवाची आराधना करून आपल्या हातांना तोंडावरून फिरवायला पाहिजे.
४) अंघोळ व पूजा सकाळी ५ ते ७ च्या दरम्यान केली पाहिजे. म्हणजेच सूर्योदयापूर्वी स्नान केले पाहिजे.
५) घरात तुळस आणि आकड्याचा रोप लावावे आणि त्याची नियमित सेवा केली पाहिजे.
६) पितृ दोषा पासून मुक्ती मिळवण्यासाठी रोज पक्ष्यांना दाणा आणि पाणी द्यावे.
७) शनिवारी व अमावास्यांच्या दिवशी संपूर्ण घराची स्वच्छता करून घरातील पसारा बाहेर काढून जोडे-चपलांचे दान केले पाहिजे.
८) जाणकार ज्योतिषास आपली पत्रिका दाखवून पत्रिकेतील दोष घालवण्यासाठी जी स्तोत्रे वाचावयास सांगितली आहेत ती नियमित पणाने ठरलेल्या वेळेत रोज वाचणे.
९) जेवढे जमेल तेवढे भाची-भाच्यांना भेटवस्तू दिली पाहिजे.
१०) घरात जेवण तयार करताना गाय आणि कुत्र्याचा भाग जरूर वेगळा काढावा. याने पितृ दोष नाहीसे होतात.
११) बुधवारी कुणालाही उधार देऊ नये , ते पैसे परत मिळणे अशक्य असते.
१२) राहू काळात कुठलेही शुभ कार्य सुरू करू नये. त्या कार्य सिद्धीस विलंब होतो किंवा अपयश मिळते.
१३) घरातील प्रत्येक सदस्याने आपल्या पत्रिके प्रमाणे जी इष्ट देवता येईल त्या इष्ट देवाचे जप व पूजन जरूर केले पाहिजे.
१४) घरातील सदस्यांनी अन्न, वस्त्र, तेल, अध्ययन सामुग्री इत्यादींचे दान केले पाहिजे. दान केल्यानंतर दुसऱ्यांकडे त्याचा उल्लेख करणे टाळावे.
१५) आपल्या राशी किंवा लग्न स्वामीच्या ग्रहाच्या रंगाची एखादी वस्तू नेहमी आपल्या जवळ ठेवायला पाहिजे.
१६) आपल्या घरातील वास्तू देवतेला रोज सकाळी आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवून तो नैवेद्य घरातील कर्त्या पुरुषाने खाल्ला पाहिजे.
१७) घरा मध्ये वाईट शब्दोच्चार टाळले पाहिजेत कारण घरातील वस्तू देवता कायम तथास्तु असे म्हणत असते. तसेच घरात मद्यपान टाळले पाहिजे. कारण घर हे मंदिरा समान असते.
१८) घरात रोज सकाळी एखाद्या मंत्र जप केला पाहिजे किंवा त्या जपाची एखादी सी डी जरूर लावली पाहिजे. या मूळे वास्तूतील बरेचसे दोष कमी होतात.
१९) आपली वास्तु एखाद्या जाणकार वास्तु तद्ण्यास दाखवून वास्तूतील दोषांवर त्वरित उपाय सुरु केले पाहिजेत.
२०) तसेच आपल्या कुंडलीत काही वास्तू दोष दाखवत असेल तर त्या दोषावर त्वरित उपाय सुरु केले पाहिजेत.
२१) प्रत्येकाने रोज सकाळी उठल्यावर आणि झोपताना किमान १० मिनिटे ध्यानास बसले पाहिजे. याने मनास आणि शरीरास उर्जा प्राप्त होते.
वरील उपाय आपण प्रामाणिक पणे व नियमित केल्यास आपले जीवन कायम स्वरूपी आनंदी होण्यास नक्कीच मदत होईल.
अधिक मार्गदर्शना साठी संपर्क = bhagyalikhit.jyotish@gmail.com
धन्यवाद !
आपला मित्र,
सचिन खुटवड
संपर्क मो - ९९२१५२५५५७
No comments:
Post a Comment