Tuesday 26 June 2012

प्रिय मित्रांनो ,

हिंदू विवाह प्रकार विषयी आज आपण माहिती घेणार आहोत !

विवाह हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात येणारा एक सुंदर प्रसंग. विवाह संस्कार ह्याचा मूळ उद्देशच वंश वृद्धी हा आहे. किंबहुना वंश वृद्धी होण्यासाठीच विवाह संस्कार केला जातो. या लेखात मी तुम्हाला विवाहाचे धर्मशास्त्राने सांगितलेल्या विविध प्रकारांची माहिती देण्याचा एक प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. आपणा सर्वांस हा लेख आवडेल असा विश्वास मला आहे. तरी लेख वाचल्यावर आपल्या प्रतिक्रया जरूर कळवाव्यात.

हिंदू विवाहाचे एकूण ८ प्रकार पडतात, ते असे -

१) ब्रम्हा विवाह २) दैव विवाह ३) आर्ष विवाह ४) प्रजापती विवाह ५) गंधर्व विवाह ६) असुर विवाह ७) राक्षस विवाह ८) पिशाच्च विवाह आता या प्रत्येक प्रकारची आपण माहिती जाणून घेऊ यात.

१) ब्रम्हा विवाह -

या विवाह प्रकारात मुलगा आपले ब्रम्हाचर्या व्रताचे पालन करून जेव्हा त्याचे व्यावहारिक शिक्षण ( आजच्या काळात कॉलेज ) पूर्ण करतो तेव्हा तो विवाहास पात्र ठरतो. मुलाचे आईवडील आपल्या मुला साठी सुयोग्य चारित्र्यवान मुलगी वधु म्हणून शोधतात. मुलाचे आईवडील स्ववर्ण,स्वजातीय व सुस्वरूप चारित्र्यवान मुलीच्या आई वडिलांकडे त्या मुलीचा हात आपल्या मुलासाठी मागतात. मुलीचे पालक देखील आपल्या मुलीसाठी त्या मुलाचे गुण, शारीरिक क्षमता व चारित्र्य पाहूनच वर म्हणून निवड करतात. ब्रम्हा विवाह हा पूर्ण पणे ठरवून ( अरेंज म्यारेज ) मुलाची आणि मुलीची एकमेकांना पसंती आहे हे पाहूनच केला जातो. या विवाहात कोणत्याही प्रकारचा हुंडा न घेता वधूचा फक्त काही कपडे व काही अलंकार घेऊन स्वीकार केला जातो. धर्म शास्त्रामध्ये अशा प्रकारच्या ब्रम्हा विवाहाला सर्वात वरचे स्थान किंवा दर्जा दिला गेला आहे.

२) दैव विवाह -

या विवाह प्रकारात वयात आलेल्या तसेच दागिन्यांनी सजलेल्या मुली साठी तिच्या आईवडिलांना जेंव्हा योग्य व सुस्वरूप वर शोधूनही सापडत नाही तेव्हा, तिचे श्रीमंत आईवडील आपल्या मुलीसाठी दूरगावी असलेला तसेच परिस्थितीने गरीब असलेला मुलगा शोधून त्याच्या बरोबर त्याच्या संमतीने आपल्या मुलीचा विवाह लाऊन देतात. या विवाहात मुलाचे गोत्र, जात काही पहिले जात नाही. असा हा मुलगा वधूच्या घरी घर जावई म्हणून राहू लागतो. या विवाहाला धर्मशास्त्रात खालचा दर्जा दिला गेला आहे.

३) आर्ष विवाह -

या विवाह प्रकारात श्रीमंत घरचा मुलगा परिस्थितीने गरीब असलेल्या मुलीच्या आई वडिलांना धन देऊन त्यांच्या सुंदर मुलीशी विवाह करतो. मुलीच्या घरची परिस्थिती गरीब असून तिचे आई वडील तिच्या विवाहाचा खर्च करण्यास असमर्थ असतात. अशा वेळी मुलीचे आई वडील मुलीपेक्षा वयाने मोठ्या व रंग रूपाने मुलीस अयोग्य अशा श्रीमंत मुलाशी आपल्या मुलीचा विवाह लाऊन देतात. या विवाहात मुलगा वधूच्या आई वडिलांना मुलीच्या बदल्यात भेट म्हणून जमीन, धन किंवा त्यासम भेट वस्तू देतो. हा विवाह मुलीला तिच्या मनाविरुद्ध मान्य करावा लागतो. येथे तिच्या भावनांचा विचार केला जात नाही. मनाविरुद्ध आणि फक्त परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी मुलगी हा विवाह मान्य करते. म्हणून धर्म शास्त्रात या विवाह आदर्श मानला गेला नाही.

४) प्रजापती विवाह -

या विवाह प्रकारात मुलीचे आईवडील आपल्या मुलीसाठी असा योग्य असा वर शोधतात कि, जो तिचे पालन, पोषण व संरक्षण योग्य पद्धतीने करू शकेल. व जेथे आपली मुलगी सुखी राहील अशा मुलाच्या हातातच आपल्या मुलीचा हात ते देतात. अशा मुलाशी आपल्या मुलीचा विवाह लाऊन देतात. येथे मुलाची व मुलाची दोघांच्या संमतीने विवाह ठरवला जातो. या विवाह पद्धती मध्ये विवाह काही काळ आधी ठरवला जातो आणि नंतर काही कालावधीने वाजत गाजत विवाह सोहळा पार पडला जातो. या विवाहास आदर्श विवाह मानले गेले आहे.


५) गंधर्व विवाह -

या विवाहात आईवडिलांची तसेच समाजाची संमती नसताना वर व वधू हे दोघे एकमेकांच्या संमतीने गुपचूप पळून जाऊन विवाह करतात. या विवाहाची माहिती दोघांच्या कुटुबियांना नसते. येथे दोघांच्या कुटुंबियांचा या विवाहाला विरोध असतो. येथे गोत्र किंवा कुळाचा विचार केला जात नाही. फक्त वधू आणि वर आपल्या आवडीचा विचार करतात. व एखाद्या मंदिरात / चर्चमध्ये / रजिस्टर विवाह करतात. या विवाह प्रकारात वधू आणि वराचे विवाह होण्या पूर्वी वासने पोटी शरीर संबंध आलेले असतात. यालाच गंधर्व विवाह म्हटले जाते आजच्या युगात याला प्रेम विवाह म्हटले जाते. केवळ आकर्षण व शारीरिक वासने पोटी हा विवाह केला जातो म्हणून याला धर्म शास्त्रात सर्वात खालचा दर्जा गेला आहे.

६) असुर विवाह -

या विवाह प्रकारात वर हा कोणत्याही प्रकारे वधूच्या योग्यतेचा नसतो. तो कोणत्याही दृष्टीने वधू पेक्षा गुणांनी व रूपाने सरस नसतो. परंतु फक्त प्रचंड संपत्तीच्या जोरावर हा मुलगा देखण्या मुलीशी विवाह करतो. येथे मुलाच्या शिक्षणाचा योग्यतेचा विचार केला जात नाही. मुलीचे आई वडील या मुलाच्या कर्जाच्या किंवा उपकाराच्या ओझ्या खाली दाबले असल्याने हा मुलगा त्यांची पिळवणूक करतो व कर्जाच्या व्याजा पोटी त्यांची सुंदर मुलगी हस्तगत करतो व तिच्याशी विवाह करतो. येथे मुलीचे आई वडील मुलाच्या दहशतीला घाबरून आपली सुंदर मुलगी त्याच्या दावणीला बांधतात. व आपली कर्जातून मुक्तता करून घेतात. म्हणून या विवाहास शास्त्राने खालचा दर्जा दिला आहे.


७) राक्षस विवाह -

राक्षस विवाहामध्ये , वर ( नवरदेव ) वधूच्या कुटुंबियांना लढाईत हरवतो , त्यांना वरचढ होतो व वधूस जबरदस्तीने विवाह करण्यास भाग पडतो . हा विवाहाचा योग्य प्रकार मनाला जात नाही , कारण या प्रकारात वर लग्नासाठी वधू वर जोर- जबरदस्ती करतो. येथे विधूस जबरदस्तीने हस्तगत केले जाते. युद्धात अनेकांचे बळी पडले जातात. म्हणून या विवाहास शास्त्राने मान्यता नाकारली आहे.

८) पिशाच्च विवाह -

पिशाच्च विवाह हा आठवा व हिंदू विवाह पद्धतीमधील शेवटचा प्रकार आहे . ह्या विवाह प्रकाराला सर्वात खालच्या दर्जाचे मानले गेले आहे , कारण या प्रकारात जरी वधू तिच्या साठी निवडण्यात आलेल्या वरासोबत विवाहास तयार नसली तरीही वधूच्या इछेचा विचार केला जात नाही . खरेतर , तिला या विवाहासाठी जबरदस्ती केली जाते . या विवाहात वधूचे कुटुंब भेटवस्तू किवा पैसे हि देत नाही . अक्षरशः वधूला तिच्या इच्चे विरुद्ध वागण्यास भाग पडले जाते . या प्रकारात पुरूष बेशुद्ध अवस्थेत असलेल्या वधू बरोबर शरीर संबंध ठेवतो किवा अमली पदार्थ पाजून स्त्रीशी जवळीक साधतो व मग तिला लग्नासाठी भाग पडतो. वधू बरोबर संभोग करताना हा वर पशु समान वर्तन करतो तिला पिडा देतो. यात संभोगा वेळी स्त्रीला शारीरिक वेदना व पिडा देऊन हा वर स्वताचे समाधान करून घेतो म्हणून या विवाह प्रकारास शास्त्रात निषिद्ध मानले गेले आहे.

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा.

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/


धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड
संपर्क मो - ९९२१५२५५५७ 

Wednesday 20 June 2012

गुरुपुष्यामृत गजांत लक्ष्मी विशेष -

मित्रांनो ,
                      गुरु पुष्यामृत या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा आहे हे आपणास माहीतच आहे. सोन्याला आपण संपत्तीचे खरे रूप मानतो, या मुहूर्तावर सोने खरेदी केल्याने संपत्ती मध्ये वाढ होत जाते हा अनुभव आहे. तसेच हि संपत्ती आपल्या घरात स्थिर राहून त्यात उत्तरोत्तर वाढ व्हावी हे आपल्या प्रत्येकाचीच इच्छा असते. आणि हि लक्ष्मी आपल्या वास्तूत स्थिर राहावी म्हणून " गजांत लक्ष्मी " चा उपयोग केला जातो. ज्याच्या दारी हत्ती झुलतात, तेथे सर्व सुख नांदते, असेच आपले शास्त्र मानते. आज हि केरळ मध्ये यश,कीर्ती व वैभव वाढावे महणून घरासमोर हत्तीची जोडी पाळण्याची परंपरा आहे. तसेच घरातही गजांत लक्ष्मीची मूर्ती ठेवण्याची परंपरा आहे. गजांत लक्ष्मी मुळे वास्तुदोषाचे निवारण होते. घरात सुख संपत्ती येते व ती टिकून राहते. वैभव व यश कीर्ती वाढते.

या विषयीची आख्यायिका अशी -
                                महाभारत काळात जेव्हा दुर्योधनाने पांडवांचे राज्य हडप केले नि त्यांना वनवासाला पाठवले तेव्हा हे राज्य परत कसे मिळवायचे या साठी भीमाने कृष्णाला विचारले तेव्हा कृष्णाने भीमाला सांगितले कि " जो व्यक्ती गजांत लक्ष्मीची स्थापना आपल्या घरात करतो त्याच्या घरी कायम संपत्ती टिकून राहते. तू या गजांत लक्ष्मीला तुझ्या घरी स्थापन कर. तुझे गेलेले राज्य तुला परत मिळेल व ते टिकून राहील ." या वर भीमाने विचारले - " गजांत लक्ष्मी मला कोठे मिळेल. " कृष्ण उत्तरला - " इंद्राचा जो ऐरावत हत्ती आहे तोच मुळात गजांत लक्ष्मी आहे तू त्याला आपल्या दारी आण म्हणजे तुला तुझे राज्य परत मिळेल नि ते टिकून हि राहील ." हे ऐकून भीम इंद्र राजाकडे गेला. त्याने त्याला ऐरावताची मागणी केली. इंद्राने भीमाला एक अट घातली तू जर या ऐरावातला उचलू शकलास तर तू याला घेऊन जाऊ शकतोस. हे ऐकून भीमाने ऐरावत हत्तीला संपूर्ण शक्ती पणाला लाऊन उचलून घेतले नि स्वताच्या दारी आणले. नि काही दिवसातच पांडवाना त्यांचे राज्य युद्धातून परत मिळाले आणि ते टिकून हि राहिले.

गजांत लक्ष्मीची मूर्ती कशी असावी ?
                           गजांत लक्ष्मी म्हणजे हत्तीची मूर्ती. सर्व शुभ चिन्हांनी परिपूर्ण अशी ती असावी, तिचा उजवा पाय पुढे म्हणजेच प्रगतीचे लक्षण, सोंड आत वळलेली म्हणजेच संपत्ती राखणारी, सुवर्णाने वर्खांकित असलेली अशी हि मूर्ती असावी. गंडस्थळावर गोमुख असावे, कमलपुष्प , गणेश , हरीण आणि मोराच्या प्रतिमा या लक्ष्मीवर कोरलेल्या असाव्यात. अशा प्रकारे सर्व शुभ चिन्हांनी परिपूर्ण असलेल्या गजांत लक्ष्मीला उत्तर दिशाभिमुख ठेवल्याने धन,कीर्ती, यश या मध्ये उतोरात्तर वाढ होत जाते असे शास्त्रात सांगितले आहे.

आपण हि या गजांत लक्ष्मीची मूर्ती गुरुपुष्यामृत या शुभ मुहूर्तावर घरात किंवा ऑफिस मध्ये स्थापन करून सुख-समृद्धी, धन , यश , कीर्ती मिळवून ती टिकवून ठेऊ शकता. 

गुरुपुष्यामृत मुहूर्त = २१ रात्री २२/६/२०१० रोजी पहाटे ४ : १६  पासून ६ :०४  वाजे पर्यंत.

मित्रांनो हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा.

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/


धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७ 

Wednesday 13 June 2012

अरेंज्ड की लव्ह मॅरेज!

अरेंज्ड की लव्ह मॅरेज!

                      किशोरावस्थेत सेटल झाल्याबरोबरच सर्वात मोठा प्रश्न म्हणजे लग्न केव्हा होणार? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुमची जन्म पत्रिका फारच महत्त्वाचे काम करते. सर्वात आधीतर हे बघणे जरूरी आहे की लग्नाचे योग आहे की नाही? पत्रिकेत सप्तम भाव विवाहाचा आणि व्यय भाव शैय्या सुखाचा असतो.

                   जर सप्तम भावाचा स्वामी सप्तम स्थानात असून बाकीचे सर्व ग्रह अनुकूल परिस्थितीत असतील व कुठलेही वाईट ग्रह किंवा निर्बळ नक्षत्राच्या प्रभावात नसतील तर विवाहाचा योग निश्चितच आहे. जर व्यय भाव आणि त्याच्या स्वामीची स्थिती चांगल्या स्थितीत असतील तर वैवाहिक सुख नक्कीच मिळेल.

                लग्नाचा योग केव्हा येईल या गोष्टींवर लक्ष्य देणे गरजेचे आहे? आधी लग्नाचे सामान्य वय 23-24 वर्ष होते. जे आता वाढून 26-27 वर्ष झाले आहे. जर बाकी सर्व गोष्टी सामान्य असतील तर या वयापर्यंत विवाह निश्चित होतो. जर सप्तम भावावर मंगळाचा प्रभाव असेल तर विवाह 28 ते 30 च्या दरम्यान होतो.

               जर सप्तम स्‍थानात शुक्र किंवा चंद्र असेल तर विवाह 24-25 वर्षात आणि शनी असेल तर विवाह 32 नंतर झालेले आढळून आले आहे. जर जन्मपत्रिकेत शनी 1, 4, 5, 9, 10 व्या भावाचा स्वामी असून सप्तममध्ये असेल आणि त्यावर गुरू किंवा शुक्राची दृष्टी पडत असेल तर लग्न लवकर होत. सप्तम भावात गुरू एकटा असेल तर लग्न उशीरा होत.


प्रेम विवाह : जर पंचम भावाचा स्वामी सप्तम भावात, लग्न किंवा व्यय भावाशी संबंध बनत असेल तर प्रेम विवाह किंवा परिचय विवाहाचा योग असतो. जर पंचमेश सप्तममध्ये किंवा सप्तमेश पंचममध्ये असेल तरी प्रेम विवाहाचा योग बनतो. जर पंचम किंवा सप्तमचा स्वामी व्यय भावात असेल तर मनाप्रमाणे विवाह होतो पण विवाह सुख मिळत नाही. जर पंचमेश किंवा सप्तमेश शुभ ग्रह असून राशी परिवर्तन करत असतील तर विवाह सुखमय आणि भाग्य वाढवणारा असतो. जर हे अशुभ ग्रह असतील तर वादविवाद कायम बनलेला असतो. सप्तमेशचे लग्नात असणेसुद्धा परिचय विवाहाचे संकेत आहे.

प्रेमविवाह होण्यासाठी पत्रिकेत खालील योग असावे लागतात.
पंचमेश सप्तमात व सप्तमेष पंचमात
पंचमेश व सप्तमेश यांची युती किंवा प्रतियोग.
पंचमेश व सप्तमेश व भाग्येष याची एकमेकाशी संबध.
शनि-शुक्र क्रेंद्रयोग व शनिच्या दशमात शुक्र.
चंद्र-गुरु नवपंचम किंवा गज केसरी योग.
शुक्र-हर्षल युती किंवा प्रतीयोग किंवा शुक्र नेपच्यून संबध.
शुक्र-रवि युती
शुक्र-मंगळ युती किंवा प्रतीयोग.
मकरेचा शुक्र शनिच्या नजरेत.
भाग्यस्थानाचा नैसर्गिक पापग्रहाशी संबध.
मकरेचा शुक्र रविने व शनिने संबधित असता अनैतिक संबध दाखवितो.


विशेष : जे लोक मंगळी असतात आणि जर त्यांचा प्रेमविवाहही होत असेल तर ते लोकं त्याच लोकांकडे आकर्षित होतात ज्यांची पत्रिका मंगळाहून प्रभावित असते किंवा पत्रिकेत शनी-राहू प्रबळ असतात. त्यामुळे त्यांचे आपसांत लग्न झालेतरी त्यांचा मंळग दोष नाहीसा होतो. ( महत्वाचा मुद्द म्हणजे शनि-मंगळ युती किंवा सष्टमस्थानात शनी असल्यास प्रेम विवाह किंवा लग्न करताना सावधान राहीले पाहिजे )

आशा प्रकारे अनेक योग पत्रिकेत पहावे लागतात त्यासाठी विवाह करण्यापूर्वी एक वेळा पत्रिका तपासून पाहने नेहमीच फायद्याचे ठरते, कारन त्या निमित्ताने पत्रिकेतिल दोष दिसून येतात व त्या दोषा वर उपासना हा उपाय करून आपण आपले जीवन सुखी करू शकता.




विवाह विषयक अधिक माहिती साठी संपर्क -  http://www.bhagyalikhit.com/



धन्यवाद !

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७